संघर्ष…

Published Aisa Bharat Banayenge, 6th edition

घराघरात एकच नारा..

हात धुवा अन कोरोनावर घाला आळा…

असे शब्द कानी पडावे,

अन् पाण्याचे महत्त्व

नव्याने कळावे..

 

जिथं तू असतोस दिवसभर,

तिथं नाहीं र कसलाच अभाव ..

अन दुसरी कडे जनतेची लूटमार,

हाचं दलालांचा स्वभाव…

 

खरंतर तुला म्हणतात जीवन,

पण तुझ्यासाठी होणाऱ्या राजकारणामूळ होते सामान्यांची वणवण,

 

तू मिळावा हा प्रत्येक मानवाचा मूलभूत अधिकार,

पण तरीही आजही त्याकरिता होतोय

जीवासाठी जीव उदार,

 

इतिहास देतो ग्वाही,

रोहिणीची धग सिद्धार्थ वाही,

समानतेच्या हक्कासाठी झाला चवदार लढा,

अन तरीही जातीपातीच्या भिंतींमध्ये आजही चालतोय गावगाडा…

नर्मदेसाठी मेधा ने ही लढला आहे लढा,

पण कावेरीचा अजूनही सुटत नाही तिढा…

 

कधी होईल र तुझ्या सारखं निर्मळ सारं जग,

खरचं कधी मिटेल रे ही तहानेची धग..

 

पाणी आहे रे सर्वांचा हक्क,

आणि हे सरकारं मात्र सारं विकण्यात व्यस्त,

होईल रे तेव्हाच सुखकर सारं..

जेव्हा माणूस म्हणून वाहिल जगण्याच्या अधिकाराचं वारं…

~ ऍड. अनुराधा भगवान नारकर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *