
खुर्चीच्या लालची व्यापाऱ्यांनी वाटणी केली थोर नेत्यांची
मराठा,महार,मांगात….
शिरवुनी जातीपातीचे भूत
जनतेच्या अंगात….
घ्या वसा जरा अण्णाभाऊ साठेंचा …होता खरा मावळा माझ्या शिवबाराजाचा…
नेली शाहिरीतून देशविदेशात
भारताच्या शिवबाची विरता.
असला जरी दलित ..
साम्यवाद सोडून बनला भीमवादी
नाही अपेक्षा केली खुर्ची ची
ना मनात होती कोणती गादी.
अण्णा माझा जरी अशिक्षित होता पण आग ओकणाऱ्या, अन्याया विरुद्ध बंड उभारणाऱ्या वृत्तीचा पूजक होता.
शाहिरी,कथा, कादंबरीतून केले समाजपरिवर्तन
नव्हता कुठलाही विनोद अण्णाच्या लिखानात, दर्शन घडवल जीवनाच्या क्रूर सत्याच.
लहुजीच्या नावाने करीत होता आरंभ, जाहला दलित साहित्यातील युगस्तंभ!
~ दिक्षा गौतम इंगोले..
विभाग – औरंगाबाद