
लाल झालेला ज्वालामुखीत कोणी टाकेल का रे हात ?
काळोख झालेला या नगरीत कोणी लावेल का रे वात ?,
जातीपातीच्या या खेळात किती झाले उध्वस्त संसार-संसार
या खेळाचा करण्या नायनाट येईल का रे परिवर्तनाची लाट ? || १||
आपल्याच तलवारीने कर्मठ षंढाणी कापिले आपलेच हात
तरीही नाही जाग आली लेका तुला, परत आणलीस मध्ये जात ?,
जरी थंड बसलास तू बघ अंगणात कसा विस्कटलेला अंधार-अंधार
मग या अंधारात समतेची ज्योत पेटवाया येईल का रे परिवर्तनाची लाट ? ||२||
ईर्षा चा भाव आणि गटा-तटात घालून त्यांनी तुकडे केले आपले सात
केले रक्ताचं पाणी महामानवानी अखंड समाजासाठी ना पहिली तुझी जात ,
त्यांच्या अपमानाचा मिळती त्यांना पुरस्कार तरी तुझा तोंडातून नाही निघे रे उदगार-उदगार
मग बंद झालेला तुझ्या मुखातून वाचा फोडाया येईल का रे परिवर्तनाची लाट ?||३||
धर्माच्या नावाखाली किती झाला हा रक्तपात दडपशाहीचं प्रतिनिधीत्व लोकशाहीला देतोया मात
आज विषमतेची गुंगी चढली मस्तकी अनेकां तीही जिरवाय देशील का समतेची साथ ?
मग तोडून निद्रा द्वेषाची खोडून अक्षरे भेदाची उठून समाजाचा करतोस का उद्धार-उद्धार ?
मग क्रांतीची मशाल पेटवून थंड झालेला समाजात येईल ना रे परीवर्तनाची लाट …||४||
~ दिपक भालेराव
विभाग – औरंगाबाद