
आमच्या देश्याचा पोशिंदा शेतकरी,
तोच बिचारा या देशात भुकेने मरी.
जिवंतपणी त्याच्यासाठी काही नाही केले,
मेल्यावर त्याला लाख रुपये दिले.
असे माझ्या देशातील पुढारी नेते,
पाच वर्षात जेवढं भेटेल तेवढं खाते.
चपराशी व्हायला पात्रता बारावी पास,
देशाचा मंत्री चालतो आठवी नापास.
देशातील शेतकरी महागाईने मरत आहे,
आमचे कृषीमंत्री क्रिकेटच पाहत आहे.
जळतो देश माझा लोक मात्र झोपलेले,
भुकेने मरून देवासाठी धर्मासाठी जागलेले.
देश माझा चांगला पण नेत्यांनी ठेवला गहाण,
तरी आम्ही म्हणतो आमचा देश महान…
~ श्वेता आनंदराव नागदिवे
विभाग – अमरावती