
गोड गोड बोलुन
भुलवनारा तो नाही
आणि
भुलनारी मीही नाही
दोघेही जानतो
वास्तव काय आहे…
दोन शरीर ऐक प्राण
म्हणनारा तो नाही
आणि मीही नाही
जानतो आम्ही
दोघांचेही वेगवेगळे
अस्तित्व आहे…
आवडत त्याला माझ लाजन
आणि मलाही त्याचा राकटपना
पण नाहीला नाहीच समजण्याची समज
त्याच्यातही
आणि
माझ्यातही आहे…
मालकी हक्क गाजवणार
डोक्यावर पदर घे म्हणणार
तो कोण होता
हा कोण होता
तु त्याच्याशी
ह्याच्याशी का बोलत होती
लिपस्टिक फेंट कर
अस काही बाही बोलत नाही तो
कारण
त्याच माझ्यावर प्रेम आहे …
मिही नाही विचारल त्याला कधी
तुझा फोन व्यस्त का होता म्हणून
आणि
खुप दिवस झाले
आठवण येत नाही का माझी म्हणून
त्याच्या सोबत
त्याच्या
मैत्रीणीण वरही तितकच प्रेम करते
कारण तो माझा
त्याच्या सकल गुण दोशा सह
मीही त्याची सर्व गुण-दोष संपन्न
मग उगाच
आणाभाका आणि स्वप्नाच्या
आखलेल्या चौकटीची उपमा
का द्यावी नात्याला
माझ्या अशा अनंत प्रेमावर
कविता लिहीण्याची
गरज काय आहे ???
– दिशा पिंकी शेख
औरंगाबाद